अखेर मान्सून आला मुक्कामाला! ‘या’ भागात पावसाचा हाय-अलर्ट जारी; तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहा Maharashtra Monsoon Update 2026

अखेर मान्सून आला मुक्कामाला! ‘या’ भागात पावसाचा हाय-अलर्ट जारी; तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहा Maharashtra Monsoon Update 2026

मुंबई:

Maharashtra Monsoon Update 2026 राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणारा मान्सून अखेर मुक्कामाला आला आहे. जून महिना संपायला अवघे ७ दिवस उरले असताना, मोसमी पावसाने वेग घेतला असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत त्याने आपला डेरा ठोकला आहे. Indian Meteorological Department (IMD) ने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आगामी ५ ते ८ दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभरात ढगांच्या गडगडाटासह दमदार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याचा अंदाज असून नदी-नाले ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ S. D. Sanap (एस. डी. सानप) यांनी स्पष्ट केले की, मान्सूनने आता गती घेतली असून महाराष्ट्रासह वर्धा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे.

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट? (IMD Regional Rain Alert):

हवामान विभागाने (IMD Alert) पुढील २ ते ५ दिवसांसाठी राज्याच्या विविध भागांत दक्षतेचा इशारा दिला आहे यामध्ये Ratnagiri (Red Alert) रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ‘Red Alert’ जारी करण्यात आला असून, तिथे अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. Raigad आणि Sindhudurg (Heavy Rain) रायगड व रत्नागिरी या दोन्ही किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Pune Ghatmatha (Orange Alert) पुण्याच्या घाटमाथ्यावरील परिसरासाठी ‘Orange Alert’ देण्यात आला असून, पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहील. तर उर्वरित महाराष्ट्र मध्ये बाकी भागात हळूहळू ढग जमा होत असून अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सरींनी हजेरी लावली आहे. येत्या ५ दिवसांत सर्वदूर चांगला पाऊस अपेक्षित आहे.

यंदा पाऊस का लांबला? जून महिन्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद

सामान्यतः जूनच्या पहिल्या २० दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतो. मात्र, यंदा ‘El Nino’ (एल निनो) च्या प्रभावामुळे मोसमी पाऊस प्रचंड लांबला. १ जूनपासून आजतागायत राज्यात पडलेल्या एकूण पावसाचा विचार केला, तर सरासरीच्या तुलनेत तब्बल ७० टक्के पावसाची तूट (Rain Deficit) नोंदवली गेली आहे. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला (Farmers Advisory):

जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत. आता जरी पाऊस सक्रिय होत असला, तरी शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या (Sowing) करू नयेत. पुरेशा पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवू नये, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. Latest Marathi News

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू