Womans Day: महिला दिन परिवर्तनाची नांदी ..!

woamans Day

&NewLine;<p>Woamans Day &colon; ८ मार्च&comma; १९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात केलेल्या ऐतिहासिक निदर्शनाच्या स्मृतिप्रित्यर्थ ८ मार्च हा &&num;8216&semi;जागतिक महिला दिन&&num;8217&semi; म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन या महिलेने १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत केला&period; तेव्हापासुन हा दिवस जगभरात साजरा केला जातो&period; आज ८ मार्च या निमित्ताने आजपर्यत स्त्रियांनी केलेल्या कामगिरीचा व परिवर्तनाचा मांडलेला आलेख…<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image alignleft size-full is-resized"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 194px&rpar; 100vw&comma; 194px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;03&sol;mahila-dain&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-1055" style&equals;"width&colon;295px&semi;height&colon;auto"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>एकोणिसाव्या शतकातील वेगवेगळया राजकीय घडामोडीनंतर जे वैचारिक परिवर्तन झाले&period; त्यामुळे स्त्रीविषयक विचारांना चालना मिळाली&period; विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा स्वतः आत्मपरिक्षणाचा&comma; विचारमंथनाचा व प्रत्यक्ष कृतींच्या प्रारंभाचा काळ होता&period; तर उत्तरार्ध झपाटयाने होणारे अंतर्बाहय बदल स्वीकारण्याचा&comma; प्रत्यक्ष चांगल्या-वाईट परिणामांचा&comma; अंतर्गत समाधानाचा आणि स्त्रीचळवळींचा कालखंड होता&period; २१ व्या शतकात आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या दिसतात&period; संगीत&comma; नृत्य&comma; अभिनय&comma; साहित्य&comma; विज्ञान&comma; संगणक&comma; माहिती तंत्रज्ञान&comma; अंतराळ व शिक्षण अशा सर्व क्षेत्रात आज स्त्रियांचे अस्तित्व व कर्तृत्व दिसून येते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आज ही सकारात्मक परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत असली तरी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात स्त्रियांना कुटूंबात व समाजात मान होता&period; गार्गी&comma; मैत्रेयी&comma; लोपामुद्रा यासारख्या विदुषीही त्या काळात निर्माण झाल्या&period; शिवकाळात जिजाऊंसारख्या राजमातांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे सुपूत्र घडविले&period; पेशवाईतसुध्दा स्त्रियांनी बरेच राजकारण केले&period; मोगलाईत स्त्रीचे स्वरूप भोगदासीचे होते&period; पण स्त्रिला महाराष्ट्रात एका बाजूला मान होता&period; पण इतके असूनही पुढे येऊन कार्य करण्याची मुभा मात्र नव्हती&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>पण त्यानंतर महात्मा फुले&comma; गोपाळ गणेश आगरकर व महर्षि कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांमुळे महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाने जोर धरला&period;<br>जगातील पहिली स्त्री चळवळकर्ती मेरी वुलस्टोनक्राफ्टने आपल्या १७९२ ला प्रसिध्द झालेल्या &&num;8216&semi;अ व्हिंडीकेशन ऑफ द राईटस ऑफ वुमन&&num;8217&semi; या पुस्तकात तिने स्त्रियांना अधिक चांगले शिक्षण मिळावे असे सांगितले&period; देशातील पहिल्या स्त्रीशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्याकडून शिक्षणाचे धडे गिरवले&period; अत्यंत कठीण व खडतर अवस्थेत तसेच सनातनी समाजाला तोंड देत त्यांनी १८४८ ला हुजूरपागेत मुलींची पहिली शाळा स्थापन करून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>19 व्या शतकानंतर पहिल्या महायुध्दाच्यावेळी अॅनी बेझंट या पाश्चात्य स्त्रीने हिंदी राजकारणात पहिल्यांदा पाऊल टाकुन १९१७ ला त्या काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या&period; त्यानंतर त्यांनी &&num;8216&semi;विमेन्स इंडियन असोसिएशन&&num;8217&semi; या नावाची राजकीय&comma; सामाजिक व स्त्रियांच्या प्रमुख प्रश्नांना राष्ट्रपातळीवर चर्चा करावयास लावणारी एक संघटना तयार केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>स्वातंत्र्यपूर्व कालखंडात डॉ&period; बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह&comma; नाशिक येथील काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह यात दलित स्त्रीयाही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या&period; तसेच दुसरे महायुध्दकाळात व स्वातंत्र्योत्तर कालखंडात हैद्राबाद मुक्ती संग्राम&comma; संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवा मुक्ती आंदोलन अशा महत्त्वाच्या आंदोलनात म्हणजेच संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य चळवळीस स्त्रियांनी खूप मोठा हातभार लावलेला दिसून येतो&period; वरील सर्व काळात स्त्रियांनी आत्मप्रेरणेने काम केल्याने जगाला स्त्रीक्षमतेची व स्त्रीशक्तीची जाणीव झाली&period; देशाची प्रगती साधावयाची असेल तर स्त्रियांना त्यात सहभागी करून घेतले पाहिजे&period; त्यांची शैक्षणिक&comma; सामाजिक प्रगती घडविली पाहिजे&period; हे विचार पुढे आल्याने स्त्रियांना पुढे येण्यासाठी वाव मिळाला व स्त्रीयांनीही यात गती घेतली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शंभर वर्षापूर्वी घर सांभाळणे&comma; मुलांना जन्म देणे&comma; संगोपन करणे तसेच कौटूंबिक जबाबदाऱ्या निभावणे एवढेच तिचे कार्यक्षेत्र होते&period; पण आज स्त्रिया धार्मिक व सामाजिक नितीनियमांना&comma; रूढीपरंपरांना मोडीत काढू लागल्या आहेत&period; स्त्रीचे कुटूंबातील स्थान व दर्जा आज उंचावला आहे&period; स्त्रीशिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसारामुळे मध्यमवर्गीय स्त्री ही औपचारिक शिक्षणाचा लाभ घेऊ शकलेली आहे&period; सुरूवातीला साक्षर होण्याची जाणीव&comma; घरगुती लिहिण्या-वाचण्याचे शिक्षण&comma; प्राथमिक शिक्षण&comma; माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण&comma; व्यवसाय व उद्योगधंद्यांचे शिक्षण&comma; विज्ञान व तंत्रज्ञान अशा पायऱ्यांनी स्त्रीशिक्षणाचा विकास झालेला दिसतो&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>हजारो वर्षाच्या रूढी व परंपरा मोडण्याचे सामर्थ्य त्यांच्यात त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे येऊ लागले&period; शिक्षणामुळे विचारपरिवर्तन&comma; विचाराबरोबर आचारपरिवर्तन होऊन त्यांच्या परिवर्तनाच्या कक्षा हळूहळू रूंदावल्या व त्या आज अनेक क्षेत्रात व अनेक चळवळीत काम करू लागल्या&period; आज स्त्रिया शिक्षिका&comma; नर्स&comma; टायपिस्ट&comma; स्वागतिका&comma; सेक्रेटरी&comma; टेलिफोन ऑपरेटर या नोकऱ्यांबरोबरच संशोधक&comma; शास्त्रज्ञ&comma; डॉक्टर&comma; इंजिनिअर&comma; पोलिस अधिकारी&comma; व्यवस्थापक&comma; उद्योजक अशा एरवी स्त्रियांना खुल्या नसणाऱ्या व स्पर्धात्मक जगात सत्ता हाती असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानावर स्त्रियांचा हळूहळू प्रवेश होऊ लागला&period; त्याचबरोबर महिला सबलीकरण व सक्षमीकरण होऊ लागलेले आहे &period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत&period; आशा&comma; लता व उषा या मंगेशकर भगिनींनी गायन क्षेत्रात&comma; मदर तेरेसा&comma; मेधा पाटकर&comma; अरूंधती रॉय&comma; किरण बेदी यांचे सामाजिक कार्य&comma; विभावरी शिरूरकर&comma; दुर्गा भागवत&comma; इंदिरा संत&comma; शशी देशपांडे&comma; शोभा डे&comma; महादेवी वर्मा&comma; सुभद्राकुमारी चौहान&comma; अमृता प्रीतम&comma; सुधा मुर्ती यांच्यासारख्या लेखिकांचे साहित्य क्षेत्रातील योगदान&comma; इदिरा गांधी&comma; सोनिया गांधी&comma; प्रतिभाताई पाटील&comma; सुषमा स्वराज&comma; मायावती&comma; जय ललिता&comma; ममता यांचे राजकारणातील योगदान&comma; इंद्रा नुयी&comma; वीणा पाटील यासारख्या व्यवस्थापिका&comma; सायना नेहवाल पी&period; टी&period; उषा&comma; कर्नाम मल्लेश्वरी&comma; सानिया मिर्झा&comma; अंजू जॉर्ज&comma; तेजस्वीनी सावंत&comma; अंजली वेदपाठक यासारख्या महिला खेळाडू या सगळ्यांकडे पाहिले की&comma; महिलांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची कल्पना आपणास येते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतही स्त्रियांना आज समान अधिकार देण्यात आलेली आहेत&period; स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षाचा आढावा घेतल्यास आपणास असे दिसते की&comma; एकपत्नीत्वचा कायदा&comma; घटस्फोटाची मुभा&comma; हुंडाबळी तसेच वारसा दत्तक-पोटगी अधिकार इत्यादी अनेक कायद्यांनी स्त्रियांचा कौटूबिक आणि सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे&period; स्त्री-स्वातंत्र्य स्त्रियांचे समान हक्क&comma; अधिकार&comma; स्त्रीमुक्ती&comma; स्त्रीचळवळ हे शब्द खरे तर विसाव्या शतकातील होते&period; आज एकविसाव्या शतकात स्त्रीला या सर्व गोष्टींची सजगतेने माहिती झालेली आहे&period; सद्यस्थितीत स्त्रीला पुरुषाइतकाच अधिकार आहे&comma; तिच्या क्षमतांना&comma; सुप्त गुणांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे&comma; तिला तिची ओळख पटवून द्यायला हवी&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याबरोबरच स्त्रियांच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष आता वेधले जाऊ लागले आहे&period;<br>आज ३३ टक्यावरून ५० टक्यापर्यंत स्त्रियांना आरक्षण संसदेत दिले असले तरी आजही ग्रामीण भागात अंधश्रध्दा&comma; उपास-तापास&comma; व्रतवैकल्ये&comma; पूजा-अर्चा यासारख्या पारंपारिक कचाटयात ती&period; अडकलेली दिसते आहे&period; निरक्षरता&comma; स्त्री-भ्रूण हत्या&comma; लैंगिक छळ&comma; हुंडाबळी याचबरोबर स्त्रियांचे फार मोठया प्रमाणात होणारे बाजारीकरण&comma; स्त्रीसौंदर्याचे प्रदर्शन तसेच पैसा व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी ती आज बळी पडलेली दिसते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आज ती आपल्या अंगभूत गुणांनी धडाडीने नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करत आहे&period; त्यासाठी पुरूषांचा सहभाग&comma; प्रोत्साहन आवश्यक आहे&period; कारण बाहेरील जगात स्त्रीने कितीही कर्तृत्व जरी दाखवले तरी कुटुंबाची&comma; मुलांची जबाबदारी तिच्यावरच येते&period; निसर्गानेही आणखी एक महत्वाची जवाबदारी तिच्यावरच टाकलेली आहे&period; या सर्व जबाबदाऱ्या पार पाडुन व पेलुन तिला आपली प्रगती करून घ्यावयाची आहे&period; पालकांनी मुलींना खूप शिकवून स्वतःच्या पायावर त्यांना उभे केले पाहिजे&period; तरच स्वातंत्र्याची&comma; आत्मसन्मानाची ज्योत महिलांच्या मनामनात उजळून तिची पुढील वाटचाल सुकर होईल&period; याच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सहा&period;प्रा&period; सुर्यकांत शामराव अदाटे<&sol;strong><br>प्रा&period; संभाजीराव कदम महाविद्यालय&comma;<br>देऊर<br>९९७५७५९३२५<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;03&sol;netsoft-1-1024x683&period;jpg" alt&equals;"woman Day" class&equals;"wp-image-1035"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">woman Day<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: