Nagarpalika Result: साताऱ्यात भाजपचा धडाका; दिग्गजांना धक्का, नगरपालिकांवर भाजपचा झेंडा

&NewLine;<p><br>सातारा &vert; विशेष प्रतिनिधी<br>सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे&period; परंपरागत राजकीय बालेकिल्ले उद्ध्वस्त करत भाजपने साताऱ्यात जोरदार मुसंडी मारली असून&comma; अनेक ठिकाणी सत्ताधारी गड कोसळले आहेत&period; फलटण&comma; वाई&comma; मेढा&comma; रहिमतपूर&comma; मलकापूरसह महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवत जिल्ह्यात आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे&period;<br>सातारा नगरपालिकेवर दोन्ही राजेंच्या नेतृत्वाखाली भाजपने गड जिंकला असून अमोल मोहिते हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत याठिकाणी महाविकास आघाडीचा सपशेल पाडाव झाला आहे&period; तर ९ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापितांना धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे&period; साताऱ्यात कमळ फुलले असल्याने एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असेलला गड पूर्ण भाजपने जिंकला आहे&period;<br>फलटण नगरपालिकेचा निकाल हा या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे&period; राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला असून&comma; माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर&comma; आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमेदवारांनी सत्ता हस्तगत केली आहे&period; नगराध्यक्ष पदासह बहुसंख्य जागांवर भाजपने विजय मिळवत फलटणमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत&period; याठिकाणी समशेरसिंह निंबाळकर यांच्या गळयात जनतेने नगराध्यक्षपदाची माळ घातली आहे&period;<br>वाई नगरपालिकेत भाजपचे अनिक सावंत यांनी नगराध्यक्षपद पटकावत भाजपची सत्ता प्रस्थापित केली&period; भाजपाने वारीमध्ये अनपेक्षित मारलेली मुसंडी मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्यासाठी विचार करायला लावणारी आहे&period;<br>रहिमतपूर नगरपालिकेत भाजपचे निलेश माने विजयी झाले असून&comma; याठिकाणी २५ वर्ष सत्तेत असलेल्या सुनील माने यांच्या वर्चस्वाला धक्का बसला असून राष्ट्रवादीला नामोहरण करण्यात आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे&period;<br>जिल्ह्यातील लक्षवेधी असलेल्या कराड नगरपालिकेत मात्र भाजप करिष्मा दाखवू शकली नाही भाजपच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या आमदार अतुल भोसले यांच्या होमपीचवर भाजपाची विकेट पडली आहे येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजेंद्रसिंह यादव व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील याच्या आघाडीने विजय संपादन केला आहे&period; राजेंद्रसिंह यादव यांना कराडकरांनी नगराध्यक्ष म्हणून विजयी केले आहे&period;<br>कराड शहरालगतच्या मलकापूर नगरपालिकेतही भाजपचे तेजस सावंत यांनी विजय मिळवला आहे&period; मेढा नगरपंचायतीत भाजप उमेदवाराच्या विजयामुळे ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे&period;<br>पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने कडवी झुंज देत विजय मिळवला असला&comma; तरी संपूर्ण जिल्ह्याच्या निकालांमध्ये भाजपच वरचढ ठरल्याचे चित्र आहे&period; अजित पवार गटाच्या पाठिंब्याने दिलीप बागडे यांनी पाचगणीत नगराध्यक्षपद जिंकले&comma; तर महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सुनील शिंदे यांनी १४५१ मतांच्या फरकाने विजय मिळवला&period; म्हसवड नगरपालिकेत देखील मंत्री जयकुमार गोरे व शेखर गोरे बंधूनी विजयाची चढती कमान कायम ठेवत विजय संपादन केला&period; <br>या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनीही किंगमेकरची भूमिका बजावली असून&comma; काही ठिकाणी सत्तास्थापनेसाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे&period; मात्र एकूण चित्र पाहता सातारा जिल्ह्यात भाजपने जोरदार कमबॅक करत विरोधकांना मोठा इशारा दिला आहे&period;<br>या निकालांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपला मोठे बळ दिले असून&comma; विरोधी पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे&period; साताऱ्यातील हा निकाल केवळ नगरपालिका निवडणूक न राहता&comma; जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: