Pune Miraj Railway प्रवास होणार अधिक गतीने

Pune Miraj Railway प्रवास होणार अधिक गतीने

शिंदवणे- आंबळे घाट सेक्शनचे दुहेरीकरण पूर्ण

मध्य रेल्वेने पुणे– मिरज दुहेरीकरण प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या अंतर्गत शिंदवणे – आंबळे घाट सेक्शनचे 9.45 कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, हा टप्पा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक मानला जातो. हा भाग डोंगराळ, अवघड वळणांचा भरलेला आणि बांधकामासाठी खूप कठीण असल्यामुळे या सेक्शनचं दुहेरीकरण खूप आव्हानात्मक ठरलं. 17 जून 2025 रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणी केल्यानंतर हा सेक्शन सुरू करण्यात आला. यामुळे Pune Miraj Railway Route मार्गांवरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

सर्वात अवघड टप्पा, अखेर काम पूर्ण

या दुहेरीकरणासह पुणे – सातारा मार्गाचे 145 कि.मी. अंतराचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, एकूण 279 कि.मी. लांबीच्या पुणे – मिरज प्रकल्पातील 258 कि.मी. अंतर आता कार्यान्वित करण्यात आले आहे.
शिंदवणे – आंबळे सेक्शन पूर्ण करताना पुढील महत्त्वपूर्ण अडचणी यशस्वीरित्या पार करण्यात आल्या.

खडतर काम अचूक नियोजन

१४० मीटर लांबीचा एक बोगदा बांधण्यात आला आहे.
१:१०० असा उतार असल्यामुळे कामासाठी अगदी अचूक योजना आणि बांधणी करावी लागली. १३ भागांमध्ये विभागलेला एक मोठा पूल बांधला गेला, ज्यामध्ये सर्वात उंच खांब ४२ मीटर उंच आहे. हा पूल एका वर्षात पूर्ण झाला. यात पाच मोठे पूल तयार करण्यात आले ज्यामध्ये विशेष प्रकारचे लोखंड व सिमेंटचे गर्डर वापरले गेले आहेत. यातील सर्वाधिक उंचीचा खांब हा १८.३ मीटर उंच आहे.
३० लाख घनमीटर माती भरून उंच भराव तयार केले गेले आहेत. यातील सर्वाधिक उंच भराव 35 मीटरचा आहे. वीस लाख घनमीटर खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये 25 मीटर पर्यंत देखील खोदकाम करण्यात आलेले आहे. २३ छोटे पूल या मार्गावर बांधले गेले. यामध्ये 16 तीव्र वळणे आहेत यातील सहा अंशाचे वळण सर्वाधिक तीव्र आहे. या प्रकल्पात डोंगर, खडक, उंच तटबंदी, खोल खोदकाम आणि मोठे पूल अशा विविध भौगोलिक आव्हाने पार करून दुहेरीकरणाचे काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात आले आहे.

Passenger Railway गाड्यांची संख्या वाढवा.

या सेक्शनचं दुहेरीकरण झाल्यामुळे रेल्वेच्या मार्गावरची गर्दी कमी होईल, गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारेल, जास्त गाड्या चालवता येतील आणि प्रवासी व मालगाड्यांची संख्या वाढवता येईल. त्यामुळे पुणे- मुंबई ज्यासाठी मिरज व कोल्हापूर हुन Passenger Railway गाड्या वाढवाव्यात अशी मागणी रेल्वे प्रवासी यांच्याकडून होत आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)