‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने……<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाराष्ट्रातील जनतेच्या अथक कष्ट&comma; प्रयत्न व संघर्ष आणि १०८ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई ही राज्याची राजधानी बनली&period; महाराष्ट्रात मराठी बोलणारे खूप लोक असले तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही कालावधी जावा लागला&period; बरेचसे साहित्यिक&comma; पत्रकार&comma; क्रांतिकारक यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे मराठी भाषेला अखेर राजभाषेचा दर्जा मिळाला&period; मराठी भाषेबद्दल अनेक संत&comma; साहित्यिकांनी गौरवास्पद लिहून ठेवलेले आहे&period; मातृभाषेची तुलना अमृताशी करताना संत ज्ञानेश्वरांनी यांनी &OpenCurlyQuote;माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’ असे म्हटले आहे&period;<br>आज मराठी भाषा महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते&period; जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे&period; मराठी साहित्यातील अनेक दिग्गज कवी&comma; लेखक यांनी मराठीत उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे&period; असेच एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर&period; मराठी ही राजभाषा&comma; ज्ञानभाषा व्हावी यांसाठी केलेल्या संघर्षामध्ये कुसुमाग्रज नेहमीच अग्रेसर होते&period; देशपातळीवर मराठी भाषेचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी खूप काम केले होते&period; त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच &OpenCurlyQuote;२७ फेब्रुवारी’ रोजी &OpenCurlyQuote;मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला&period; २१ जानेवारी २०१३ मध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात आली&period; तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिवस आणि २१ फेब्रुवारीला &OpenCurlyQuote;जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो&period;<br>या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेविषयी आपण काही गोष्टी जाणून घेऊया&period; मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला आहे&period; या भाषेची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे&period; पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला&period; नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली&period; इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळाचरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली&period; संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली&period; मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी&comma; ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे&period; या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे&period; छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले&period; महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला&period;<br>मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा&comma; गुजरात&comma; मध्यप्रदेश&comma; तामिळनाडू&comma; कर्नाटक&comma; छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते&period; भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते&period; मराठी भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक असून जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही १५ वी भाषा आहे&period; तर भारतातली तिसरी भाषा आहे&period; याबरोबरच महाराष्ट्र आणि गोव्याची मराठी ही अधिकृत भाषा आहे&period; मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा आहे&period; हा वारसा आणि परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या तरुणीवर आहे&period;<br>मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने वि&period;वा&period;शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातील कार्यास अभिवादन करूया&period; कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे&period; कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले&period; कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे&period; त्यांनी मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले&period;<br>आज &&num;8216&semi;मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचे&comma; संस्कृती आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी या दिवशी सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात&period; मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव म्हणून सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही दिले जातात&period; मराठी भाषेचे संवर्धन करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे&period; या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण&comma; निबंध&comma; नाटक&comma; वकृत्व&comma; कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात&period;<br>आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्व टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे&period; मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणार्‍या पिढील मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे&period; संतांनी&comma; लेखकांनी&comma; इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेले ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे&period; तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल&period; त्यामुळे आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा&period; मराठी भाषा समृध्द करण्यासाठी तसेच जोपसण्यासाठी प्रयत्न करावेत&period;<br>विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले&period; कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार&comma; ज्ञानपीठ पुरस्कार विजेते&comma; मराठी भाषेतील अग्रगण्य आणि चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी&comma; थोर लेखक&comma; नाटककार&comma; कथाकार&comma; कादंबरीकार&comma; लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक म्हणून ओळखले जातात&period; ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात&period; शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असे करतात&period;<br>कुसुमाग्रजांनी अक्षरबाग&comma; किनारा&comma; चाफा&comma; छंदोमयी&comma; जाईचा कुंज&comma; जीवन लहरी&comma; थांब सहेली&comma; पांथेय&comma; प्रवासी पक्षी&comma; मराठी माती&comma; महावृक्ष&comma; माधवी&comma; मारवा&comma; मुक्तायन&comma; मेघदूत&comma; रसयात्रा&comma; वादळ वेल&comma; विशाखा&comma; श्रावण&comma; समिधा&comma; स्वगत&comma; हिमरेषा असे एकाहून एक सरस कविता संग्रह लिहून आपल्यातील कवित्त्वाची साक्ष दिली&period; त्याचबरोबर आहे आणि नाही व प्रतिसाद हे दोन लघुनिबंध संग्रह ही लिहिले&period; त्यांची ऑथेल्लो&comma; आनंद&comma; आमचं नाव बाबुराव&comma; एक होती वाघीण&comma; किमयागार&comma; कैकेयी&comma; कौंतेय&comma; जेथे चंद्र उगवत नाही&comma; दिवाणी दावा&comma; दुसरा पेशवा&comma; दूरचे दिवे&comma; देवाचे घर&comma; नटसम्राट&comma; नाटक बसते आहे&comma; बेकेट&comma; महंत&comma; मुख्यमंत्री&comma; ययाति देवयानी&comma; राजमुकुट&comma; विदूषक&comma; वीज म्हणाली धरतीला&comma; वैजयंती अशी एकाहून एक गाजलेली नाटके मराठी रंगभूमीला देऊन एक अमरत्व बहाल करणारा रंगकर्मी ते बनले&period;<br>कविता आणि नाटकाबरोबरच त्यांनी कथाही लिहिल्या&period; अंतराळ&comma; अपॉईंटमेंट&comma; एकाकी तारा&comma; काही वृद्ध काही तरुण&comma; जादूची होडी&comma; प्रेम आणि मांजर&comma; फुलवाली&comma; बारा निवडक कथा&comma; सतारीचे बोल असे कथासंग्रह लिहून साहित्याच्या दरबारातील नवरत्न म्हणून ते प्रसिद्धीस पावले&period; कादंबरी या साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी अगदी झोकात पदार्पण करून मराठीतील जेष्ठ कादंबरीकार म्हणून मान्यता पावले&period; त्याच्या कल्पनेच्या तीरावर&comma; जान्हवी&comma; वैष्णव&comma; आठवणीपर&comma; वाटेवरच्या सावल्या या कादंबऱ्यांनी मराठी भाषेत नवा उच्चांक प्राप्त केला&period;<br>वि&period;वा&period; शिरवाडकरांना महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार मिळाले त्यात ’मराठी माती’ला १९६० साली&comma; ’स्वगत’ला १९६२ साली&comma; ’हिमरेषा’ला १९६२ साली&comma; ’नटसम्राट’ला १९७१ साली&comma; ’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार &lpar;१९७४&rpar;&comma; &&num;8220&semi;ययाती आणि देवयानी&&num;8221&semi; या नाटकास १९६६ या वर्षी तर संगीत &&num;8220&semi;वीज म्हणाली धरतीला&&num;8221&semi; या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले&period; त्यांच्या विशाखा या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला&period;<br>भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार १९९१ साली त्यांना प्रदान करण्यात आला&period; त्याचबरोबर भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार&comma; अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा &OpenCurlyQuote;राम गणेश गडकरी’ पुरस्कार त्यांना १९६५ मध्ये प्राप्त झाला‌&period;त्यांच्या कारकीर्दीचा गौरव करताना भारत सरकारने अंतराळातील एका ताऱ्यास &OpenCurlyQuote;कुसुमाग्रज’ हे नाव दिले गेले&period; सन १९७४ साली त्यांना &&num;8216&semi;नटसम्राट&&num;8217&semi; नाटकाला &&num;8216&semi;साहित्यसंघ&&num;8217&semi; पुरस्कार मिळाला&period; सन १९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना &&num;8216&semi;डि&period;लिट्&&num;8217&semi; ही सन्माननीय पदवी प्रदान केली&period; सन १९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला&period; याबरोबरच वि&period;वा&period; शिरवाडकरांना मिळालेले सन्मान त्यांच्या साहित्यिक कार्याची प्रचीती देतात&period; मुंबई&comma; मडगाव&comma; कोल्हापूर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते&period; अशा या महान साहित्यिकाला त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन……&period;&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सहा&period;प्रा&period;सुर्यकांत शामराव अदाटे<&sol;strong><br>&lpar;लेखक प्रा&period;संभाजीराव कदम महाविद्यालय&comma;देऊर येथे सहाय्यक प्राध्यापक असून दुर्ग भेटी आणि पर्यटन यावर विविध वृत्तपत्रातून लेखन करतात&period;&rpar;<br>९९७५७५९३२५<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: