कॉमर्स च्या विद्यार्थ्यांना A.I.आधारित बँकिंगचे प्रशिक्षण आवश्यक : दिगंबर सूर्यवंशी

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">साताऱ्यात मार्गदर्शन वर्गाचे आयोजन <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या डॉ&period; चिंतामणराव देशमुख वित्तीय समावेशन अध्यासनाच्या वतीने आयोजित विशेष मार्गदर्शन वर्गात आरबीएल बँकेचे वाइस प्रेसिडेंट श्री&period; दिगंबर सूर्यवंशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या &lpar;Artificial Intelligence&rpar; बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील उपयोगांवर प्रकाश टाकला&period; विद्यापीठाच्या वाणिज्य व बँकिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या मार्गदर्शन वर्गात श्री&period; सूर्यवंशी यांनी सांगितले की&comma; कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक काळातील महत्त्वाचे तंत्रज्ञान असून&comma; बँकिंग क्षेत्रात ग्राहक सेवा&comma; व्यवहारांचे व्यवस्थापन&comma; व फसवणूक रोखण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे&period; भविष्यात बँकिंग सेवा अधिकाधिक स्वयंचलित व डिजिटल स्वरूपाच्या होणार असून&comma; रोजगाराच्या संधींमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत&period; कार्यक्रमात श्री&period; सूर्यवंशी यांनी सुचवले की&comma; विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील विशेष अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे&period; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील व्यवहार अधिक जलद&comma; सुरक्षित आणि सुलभ होणार असून त्याचा आर्थिक व्यवस्थापनावर सकारात्मक परिणाम होईल&period; धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात सुरू असलेल्या स्टॉक मार्केट लॅबोरेटरी&comma; मॉक बँक&comma; व बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना क्षेत्रातील रोजगार संधी अधिक सहज उपलब्ध होत आहेत&period; आता येथून पुढील काळात वाणिज्य व बँकिंग चं विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आधारित कोर्सेस देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी त्यांनी व्यक्त केले&period;<br>कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ&period; ज्ञानदेव मस्के यांनी सांगितले की&comma; विद्यापीठातील सर सी&period;डी&period; देशमुख अध्यासनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वित्तीय जागरूकता वाढवणे व विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्यांशी जोडणे&period;<br>कर्मवीर विद्यापीठाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांपर्यंत वित्तीय जागरूकता पोहोचवण्याचे काम चालू आहे&period; कुलगुरू डॉ&period; ज्ञानदेव मस्के यांनी सांगितले की&comma; या अध्यासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी संशोधन व प्रगत माहितीची दारे उघडली जातील असे मत त्यांनी व्यक्त केले&period;<br>डॉ&period; विजय कुंभार&comma; विद्यापीठाचे कुलसचिव&comma; यांनी सांगितले की&comma; रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व चेअरमन श्री&period; चंद्रकांत दळवी यांच्या कल्पकतेतून रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अभ्यासक्रम व प्रशिक्षण सुरू आहे&period; या उपक्रमामुळे विद्यार्थी जागतिक तंत्रज्ञान प्रवाहाशी जुळवून घेत आहेत या उपक्रमास अनुसरून कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा &lpar;Artificial Intelligence&rpar; बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील वापर यावर विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले&period;<br>कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ&period; विजय कुंभार यांनी केले&comma; तर प्रमुख वक्त्यांची ओळख डॉ&period; राजशेखर निल्लोलू यांनी करून दिली&period; कार्यक्रमाचे संयोजन डॉ&period; विजय पाटील व प्रा&period; रोहिणी भोसले यांनी केले&period; विद्यापीठातील शिक्षक&comma; शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Artificial Intelligence <&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: