Satara: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><em>राज्यपाल सी&period;पी&period; राधाकृष्णन यांच्या उपस्थि<&sol;em>ती <br><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong><em>कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य प्रेरणादायी<&sol;em><br><em>&&num;8211&semi; राज्यपाल सी&period;पी&period; राधाकृष्णन<&sol;em><&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Satara&colon; कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य पिढ्यानं पिढ्यासाठी प्रेरणादायी आहे&period; रयत शिक्षण संस्था त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा दाखला देते&period; त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्‍ट्या वंचित जनतेच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले&comma; असे प्रतिपादन राज्यपाल सी&period;पी&period; राधाकृष्णन यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा &lpar;राज्य सार्वजनिक विद्यापीठ&rpar; प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल सी&period;पी&period; राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी कॉलेज येथे पार पडला&period; यावेळी ते बोलत होते&period; या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी&comma; कुलगुरु डॉ&period; ज्ञानदेव मस्के&comma; राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे&comma; परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र&period; संचालक डॉ&period; हेमंत उमाप&comma; कुलसचिव डॉ&period; विजय कुंभार आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले&comma; शिक्षण आणि जीवन व्यवहारांचा समन्वय असणे आवश्यक आहे&period; जगाच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा शिक्षणामध्ये अंतर्भाव असणे आवश्यक आहे&period; हा समन्वय साधण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचे आहे&period; याचा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आणि विद्यापीठांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे जगाच्या बाजारात टिकणारे असले पाहिजे&comma; या दृष्टीने शैक्षणिक धोरण विकसित केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा त्यांच्या सामाजिक न्याय&comma; समता आणि शिक्षणासाठीच्या चिकाटीच्या बांधिलकीत आहे&period; शिक्षणाद्वारे वंचितांना सक्षम बनविणे&comma; त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम करणे यावर त्यांचा विश्वास होता&comma; असे सांगून राज्यपाल म्हणाले&comma; आज आपण एकता&comma; बंधुता&comma; सामाजिक न्याय यावंर चर्चा करतो पण याची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांनी केली&period; जाती&comma; धर्माच्या आधारावर आपण माणसा-माणसात भेद करु शकत नाही&period; एखाद्या विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून आपण कोणाला थोर अथवा कनिष्ठ ठरवू शकत नाही&period; माणसाचे श्रेष्ठत्व हे त्याच्या कतृत्वावरुन ठरते&comma; ही गोष्ट आपण जन्मभर लक्षात ठेवली पाहिजे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे अलिकडेच सन 2021 मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ आहे&period; पण या 4 वर्षाच्या काळात या विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती केली आहे&comma; असे सांगून राज्यपालांनी विद्यापीठाचा परिसर स्वच्छ आणि सुव्यस्थित ठेवल्याबद्दल कौतूक केले&period; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलेले आहे&period; ते सुरु करताना भारताला सर्वात स्वच्छ&comma; सुव्यस्थित आणि हरित देश बनविण्याचे स्वप्न त्यांच्या उराशी होते&period; हे लक्षात ठेवून आपणही त्यामध्ये योगदान दिले पाहिजे&comma; असे सांगितले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>विद्यापीठाबद्दल बोलताना ते म्हणाले&comma; 2021 मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठात तीन घटक महाविद्यालयांचा समावेश आहे&period; ज्यामध्ये 7 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे ज्ञान आणि उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी शिक्षक&comma; प्रशासक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे&period; पण एवढ्यावरच संतुष्ट न राहता आपण अधिकाधिक प्रगती करत राहिलो तरच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करु शकू&period; विद्यार्थ्यांनो तुम्ही प्रथम आज्ञाधारकपणा शिका&comma; कारण विद्यापीठांमधले जीवन आणि बाहेरच्या जगातले जीवन यात फार फरक असतो&period; चांगले सामाजिक जीवन जगणे ही अवघड पण फार महत्वाची बाब आहे&period; पहिल्यांदा तुम्ही आज्ञाधारकपणा शिका&comma; आदेश देणे तुम्हाला आपोआप जमेल&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कोणतेही यश हे समर्पण&comma; कष्ट याशिवाय मिळत नाही&period; संपूर्ण क्षमता वापरुन&comma; झोकून दिल्याशिवाय ते मिळत नाही&period; जीवन हे पुढे पुढेच जात असते&comma; पण जर आपण जीवनात यशस्वी झालो नाही तर त्याचा काय लाभ असे सांगून राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले&comma; तुमची उद्दिष्टे निश्चित करा&period; त्यासाठी गतीने प्रयत्न करा&period; आपली तुलना कधीही दुसऱ्याशी करु नका&period; प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात&period; कधीकधी उद्दिष्टपूर्तीच्या वाटेत नैराश्यही येते&comma; अशावेळी अल्प विश्रांती घेण्यात काहीही गैर नाही&period; पण ध्येय अर्धवट सोडू नका&period; सातत्यपूर्ण प्रयत्न करा&comma; यश नक्की मिळेल&period; तुमच्यात उत्सुकता&comma; प्रेरणा&comma; उर्जा सदैव जागृत ठेवा&comma; अशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी कुलाधिकारी श्री&period; दळवी म्हणाले&comma; देश व राज्य सुसंस्‍कृत करण्यात रयत शिक्षण संस्थेचे योगदान अमुल्य आहे&period; कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न शासनाच्या धोरणामुळे शक्य झाले आहे&period; हे विद्यापीठ रयत शिक्षण संस्थेसाठी मानबिंदू आहे&period; यशाचा रस्ता अनेकदा खडतर असतो आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी केला तर तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून वेगळी ओळख निर्माण करु शकाल&period; शिक्षण आणि प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराच्या आवश्यक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हे विद्यापीठ प्रयत्नशील आहे&period; या विद्यापीठामध्ये सर्वोत्कृष्ठ विद्यापीठ बनण्याची क्षमता आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी कुलगुरु डॉ&period; मस्के यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा वार्षीक अहवाल सादर केला&period; विविध विद्या शाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना सादर केले&period; विविध विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट गुण मिळविलेल्या तीन स्नातकांना प्रत्यक्ष समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली&period; यानंतर सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या 31 स्नातकांना पदवी देण्यात आली&period; पदवी परिक्षेत 679 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या अर्जांनुसार पदवी देण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन&comma; पोलीस अधीक्षक समीर शेख&comma; महाविद्यालयांचे प्राचार्य&comma; अधिष्ठाता&comma; नियामक मंडळाचे सदस्य&comma; विद्यार्थी&comma; विद्यार्थींनी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: